आजच्या दैनिक एकमत मधील #सप्तरंग_पुरवणी मध्ये 'आशेचं बेट'या सदरात श्री संतोष मुसळे यांनी माझ्याविषयी लिहलेला लेख....#ज्ञानपंढरी_उभारताना..
ज्ञानपंढरी उभारताना
आषाढ महिना सुरु झाला की,वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरीचे.मात्र विद्यार्थी हाच आपला पांडुरंग आणि नौकरीचे गाव हेच पंढरपूर ही खुणगाठ मनाशी घट्ट बांधून मागील दहा वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा आधार घेत गावात ज्ञानपंढरी उभारणारे ज्ञानेश्वर झगरे हे जालना जिल्ह्यातील एक उपक्रमशिल शिक्षक आहेत.
शैक्षणिक उपक्रमांचा जिल्हा म्हणून जालना जिल्हाची ओळख सर्वत्र आहे.याच जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील घाणखेडा नावाचे छोटेसे गाव आहे. गावाच्या नावावरुन आपण अचंबित व्हाल मात्र
पूर्वीच्या काळी तेलाचे घाणे होते, यामुळे खुप घाण व्हायची म्हणून घाणखेडा नाव पडले.
स्वतः वारकरी कीर्तनकार असलेले आणि उत्तम कथाकार असलेले श ज्ञानेश्वर गणपत झगरे सर यांनी खऱ्या अर्थाने या शाळेच्या विकासाची मुहूर्तमेढ १० वर्षांपूर्वी रोवली आणि अविरतपणे ही शाळा सतत प्रगतीचा आलेख उंचावत आहे.
ज्ञानेश्वर झगरे यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील माँ जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील वाकद(जहागीर)या खेडेगावात झाला. प्राथमिक शिक्षण गावातील जि प शाळेत घेऊन त्यांनी देऊळगाव राजा येथील नामांकित देऊळगाव राजा हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षणाला सुरवात केली, आणि इयत्ता दहावीत असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कौटुंबिक हालअपेष्टा असतांना सुद्धा आई कुशावर्ता आणि किराणा दुकान चालवणारे भाऊ विठ्ठल झगरे यांच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून डी एड सीईटी मध्ये गुणवत्ता यादीत येऊन घाणखेडा या गावी त्यांची प्रथम नियुक्ती झाली.
"नसे राऊळी वा नसे मंदिरी।
जिथे राबती हात तेथे माझा हरी"।
या उक्तीप्रमाणे त्यांनी या घाणखेडा येथील शाळेला मंदिर मानून तेथील विद्यार्थ्यांना देवता समजत या विद्यमंदिराचा विकास करण्याचे ठरविले आणि आज तो त्यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याचं दिसतंय.शाळेच्या मैदानावर गावातील नागरिकांनी अतिक्रमण करून तिथे गुर, बकऱ्या बांधणे. इमारतीचा लग्न कार्यासाठी वापर होत होता,स्वछता नव्हती.मैदानात ओसाडपणा होता.पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती.... जुन्या पद्धतीचे शिक्षण होते.खेळ, संगीत, गायन वादन , वेशभूषा , नाटय, लेझीम, डुंबेल्स , विविध कवायती भाषण, इंग्रजी शिक्षणाची आवड नव्हती.
घाणखेडा हे गाव तसं शैक्षणिक दृष्टीने मागासलेले असले तरी येथील माणसांमध्ये असलेली माणुसकी आणि मानवता जाणून झगरे सरांनी गावकऱ्यांना
शाळेच्या विकासासाठी सहभागी करण्याचे ठरविले.
सर्वप्रथम आपला स्वतः वर्ग त्यांनी प्रगत करण्याचे ठरविले, त्यासाठी स्वतः शैक्षणिक साहित्य तय्यार करून, हसत खेळत आनंददायी शिक्षण देत त्यांनी आपला वर्ग पूर्ण प्रगत केला,मैदानावर कृतीगीते, लेझीम, डंबेल्स वाजायला लागल्याने गावकरी आणि पालक यांचे लक्ष शाळेकडे वेधण्यात सर यशस्वी झाले.
आषाढ महिना सुरु झाला की,वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरीचे.मात्र विद्यार्थी हाच आपला पांडुरंग आणि नौकरीचे गाव हेच पंढरपूर ही खुणगाठ मनाशी घट्ट बांधून मागील दहा वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा आधार घेत गावात ज्ञानपंढरी उभारणारे ज्ञानेश्वर झगरे हे जालना जिल्ह्यातील एक उपक्रमशिल शिक्षक आहेत.
शैक्षणिक उपक्रमांचा जिल्हा म्हणून जालना जिल्हाची ओळख सर्वत्र आहे.याच जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील घाणखेडा नावाचे छोटेसे गाव आहे. गावाच्या नावावरुन आपण अचंबित व्हाल मात्र
पूर्वीच्या काळी तेलाचे घाणे होते, यामुळे खुप घाण व्हायची म्हणून घाणखेडा नाव पडले.
स्वतः वारकरी कीर्तनकार असलेले आणि उत्तम कथाकार असलेले श ज्ञानेश्वर गणपत झगरे सर यांनी खऱ्या अर्थाने या शाळेच्या विकासाची मुहूर्तमेढ १० वर्षांपूर्वी रोवली आणि अविरतपणे ही शाळा सतत प्रगतीचा आलेख उंचावत आहे.
ज्ञानेश्वर झगरे यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील माँ जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील वाकद(जहागीर)या खेडेगावात झाला. प्राथमिक शिक्षण गावातील जि प शाळेत घेऊन त्यांनी देऊळगाव राजा येथील नामांकित देऊळगाव राजा हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षणाला सुरवात केली, आणि इयत्ता दहावीत असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कौटुंबिक हालअपेष्टा असतांना सुद्धा आई कुशावर्ता आणि किराणा दुकान चालवणारे भाऊ विठ्ठल झगरे यांच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून डी एड सीईटी मध्ये गुणवत्ता यादीत येऊन घाणखेडा या गावी त्यांची प्रथम नियुक्ती झाली.
"नसे राऊळी वा नसे मंदिरी।
जिथे राबती हात तेथे माझा हरी"।
या उक्तीप्रमाणे त्यांनी या घाणखेडा येथील शाळेला मंदिर मानून तेथील विद्यार्थ्यांना देवता समजत या विद्यमंदिराचा विकास करण्याचे ठरविले आणि आज तो त्यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याचं दिसतंय.शाळेच्या मैदानावर गावातील नागरिकांनी अतिक्रमण करून तिथे गुर, बकऱ्या बांधणे. इमारतीचा लग्न कार्यासाठी वापर होत होता,स्वछता नव्हती.मैदानात ओसाडपणा होता.पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती.... जुन्या पद्धतीचे शिक्षण होते.खेळ, संगीत, गायन वादन , वेशभूषा , नाटय, लेझीम, डुंबेल्स , विविध कवायती भाषण, इंग्रजी शिक्षणाची आवड नव्हती.
घाणखेडा हे गाव तसं शैक्षणिक दृष्टीने मागासलेले असले तरी येथील माणसांमध्ये असलेली माणुसकी आणि मानवता जाणून झगरे सरांनी गावकऱ्यांना
शाळेच्या विकासासाठी सहभागी करण्याचे ठरविले.
सर्वप्रथम आपला स्वतः वर्ग त्यांनी प्रगत करण्याचे ठरविले, त्यासाठी स्वतः शैक्षणिक साहित्य तय्यार करून, हसत खेळत आनंददायी शिक्षण देत त्यांनी आपला वर्ग पूर्ण प्रगत केला,मैदानावर कृतीगीते, लेझीम, डंबेल्स वाजायला लागल्याने गावकरी आणि पालक यांचे लक्ष शाळेकडे वेधण्यात सर यशस्वी झाले.

No comments:
Post a Comment